सरकारकडून प्रश्नांची यादी जाहीर, तब्बल इतक्या वर्षानंतर होणार जातीनिहाय जनगणना, वाचा प्रश्नांची यादी
दिल्ली – भारत सरकारने यंदा जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. १९३१ नंतर देशात पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे. २०२६ पासून ही जनगणना होणार असून यावेळी विचारल्या जाणारी प्रश्नांची यादी समोर आली आहे.
देशातील लडाख सारख्या दुर्गम भागात जनगणना १ आॅक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. तर देशातील इतर भागात १ मार्च २०२७ पासून जनगणना सुरू होणार आहे. या जनगणनेत भारतीय कुटुंबांचे सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करण्यासाठी ३६ प्रश्न तयार करण्यात आले आहेत. जनगणना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण प्रक्रियेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यासाठी हजारो कर्मचारी असणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रशिक्षणाची तयारी सरकारने सुरु केलेली आहे. या जनगणनेच्या आधारे आगामी निवडणुकीतील मतदारसंघ आणि आरक्षित मतदारसंघ याची निश्चिती केली जाण्याची शक्यता आहे.
नाव, वैवाहिक स्थिती आणि मुलांची माहिती
शैक्षणिक पात्रता
धर्म, जात
रोजगाराचा प्रकार (सार्वजनिक, खासगी, स्वयंरोजगार)
टेलिफोन, इंटरनेट, मोबाइल किंवा स्मार्टफोनची उपलब्धता
सायकल, स्कूटर, मोटरसायकल किंवा कारची मालकी
घरात वापरले जाणारे मुख्य धान्य
पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत
प्रकाशाचा मुख्य स्रोत
शौचालयाची उपलब्धता आणि त्याचा प्रकार
सांडपाण्याचा निचरा, स्नानगृहाची उपलब्धता
स्वयंपाकघर आणि LPG/PNG जोडणी