तुमची मुले शाळेत जातात का? मग ही बातमी वाचा

शाळेचे वेळापत्रक आणि नियमात बदल, आता या वेळेत भरणार शाळा, असे असेल वेळापत्रक

पुणे – पावसाळा सुरु झाला की सगळ्यांना वेध लागतात ते शाळा सुरु होण्याचे. महाराष्ट्रातील शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. पण यंदा शाळेच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना आपला दिनक्रम बदलावा लागणार आहे.

येत्या १६ जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी नऊ वाजेला भरलेला आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. राज्यातील शाळा आता सकाळी नऊ ते सायंकाळी चार पर्यंत राहतील. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सकाळी नऊ वाजेपासून ते ९.२५पर्यंत परिपाठ राहील. ९.२५ पासून ते ११.२५ पर्यंत सुरुवातीचे तीन लेक्चर्स होतील. ११.२५ ते ११.३५ पर्यंत दहा मिनिटांची लहान सुट्टी राहील. ११.३५ ते १२.५० पर्यंत दोन तासिका होतील.१२.५० ते दीड वाजेपर्यंत मोठी सुट्टी राहील. दीड वाजेपासून ते ३.५५ मिनिटांपर्यंत उर्वरित तासिका घेतल्या जाणार आहेत आणि शेवटचा पाच मिनिटात वंदे मातरम होईल आणि शाळा सुटणार आहे. सदरचे वेळापत्रक येत्या शैक्षणिक वर्षांपासून अमलात येणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद यांच्या शिक्षणाधिकारी व शिक्षण प्रमुखांना हे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल, असेही सूचित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशीम, आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता राज्यातील २५ जिल्ह्यांमधील शाळा १६ जून पासून सुरू होतील. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमधील शाळा २३ जून पासून सुरू होणार आहे.