
हवामान खात्याचा इशारा, देशात दोन चक्रीवादळे धडकणार, महाराष्ट्रात काय असणार परिस्थिती?

दिल्ली – भारतीय हवामान विभागने १८ राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे, कारण भारतामध्ये एकाचवेळी दोन चक्रीवादळ धडकणार आहेत. यामुळे १८ राज्यांना मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे, आणि पुढील काही तासांमध्ये हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

पहिलं चक्रीवादळ इराकहून उत्तर भारताकडे सरकलं आहे, ज्यामुळे दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरं चक्रीवादळ बांग्लादेशातून भारतामध्ये धडकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळांच्या वेगामुळे वाऱ्याचा वेग प्रति तास ६० किमी पेक्षा अधिक असू शकतो. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आयएमडीने केले आहे. पण महाराष्ट्रात उन्हाळ्याचे दिवस जसे जसे पुढे जात आहेत तसे तसे तापमान वाढत असून आतापासूनच उष्णतेच्या झळा बसत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खासकरुन विदर्भात नेहमीप्रमाणे यंदाही तापमान वाढलेले आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला आणि त्यानंतर नागपूरमध्ये नोंदवले गेले आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे ४१.३ अंश सेल्सियस तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १८.४ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. आगामी काळात महाराष्ट्रात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली येथे देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. बिहार,पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा असून अरुणाचल प्रदेश येथे बर्फवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.









