‘या’ तारखेला जाहीर होणार दहावी आणि बारावीचा निकाल

शिक्षण मंडळाकडून महत्वाची माहिती, ‘या’ तारखेला असणार २१ लाख विद्यार्थ्यांच्या निकालाची उत्सुकता

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी – बारावीच्या निकालाबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा निकालाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्‍या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. निकालाच्या तारखांबाबत लवकरच मंडळाकडून घोषणा केली जाईल.यंदा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात बारावीच्या परीक्षा झाल्या. तर, दहावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या २१ लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. सध्या तयारी अंतिम टप्प्यात असून पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाबाबत सांगितले की, ‘सर्वांच्या सहकार्याने दहावी-बारावीच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडल्या. किरकोळ घटना वगळता यंदा कॉपी करण्याच्या घटना कमी झाल्या. पेपर तपासणारे शिक्षक आणि मॉडरेटर यांनी दिलेल्या वेळेत त्यांचे काम पूर्ण केलेय. त्यामुळे राज्य मंडळाने यंदा दहावी-बारावीचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर करण्याचे जे आश्वासन दिले होते, त्यानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी बारावीचा निकाल २० मे नंतर लागला होता. मात्र यंदा बारावीचा निकाल १० मेच्या आधी आणि दहावीचा निकाल १५ मेच्या आधी लागणार आहे. या निकालानंतर विद्यर्थाी आणी पालकांना पुढील शिक्षणासाठी निर्णय घेण्यास वेळ मिळणार आहे. दरम्यान आता विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.